शिवचरित्र भाग – 6 ( तोरण स्वराज्याचे )
शिवरायांकडे पुणे , सुपे , चाकण व इंदापूर या भागाची सुभेदारी होती . परंतु या जहागिरीतील सर्व किल्ले आदिलशहाच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते . शिवरायांना माहीत होते की किल्ल्याशिवाय आपल्या राज्याची ताकत वाढत नाही व जर आपल्याला आदिलशाही व मुघल असल्या मोठ्या ताकटवर राज्यांसोबत लढायचे असेल तर गड-किल्ले जिंकणे गरजेचे आहे . त्यांनी किल्य्यांचे महत्व ओळखले होते .